जोधपूर – सेल्फी काढणे पुन्हा एका तरुणाच्या जीवावर बेतली. किल्ल्याच्या भिंतीवर चढुन सेल्फी काढताना भिंतीवरुन पाय घसरुन त्याचा मृत्यू झाला. ही घटना राजस्थानच्या जोधपूर येथे घडली आहे.
या तरुणाचे नाव निखिल असे आहे. तो आपल्या मित्रांसोबत मेहरानगड पाहण्यासाठी गेला होता. गडावर ज्या तोफा आहेत त्यांच्या भिंतीवर चढुन निखिल सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचा पाय घसरुन त्याचा तोल गेला व तो चारशे फूट खोल दरीत कोसळला.
या घटनेनंतर मेहरानगड ट्रस्टच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. निखिलला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
२९ जानेवारी रोजी निखिलचे लग्न होते. त्याआधीच त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.