चीनने तिबेट सीमा बंद केली, कैलास मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय भाविकांना फटका

चीनने तिबेट सीमा बंद केली, कैलास मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय भाविकांना फटका

हिंदी-चीनी भाई भाई असा नारा देऊन चीनने भारताच्या पाठीत पुन्हा एकदा खंजीर खुपसला आहे. कारण चीनने तिबेटला लागून असलेल्या सर्व सीमा बंद केल्या आहे. यामुळे तिबेटमध्ये असलेल्या कैलाश मानसरोवरच्या यात्रेला जाणाऱ्या भारतीय भाविकांना मोठा फटका बसणार आहे.

नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर चीनने तिबेट सीमा बंद केली आहे. त्यामुळे नेपाळच्या मार्गे तिबेटमध्ये कैलास मानसरोवरच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या योजना बदलाव्या लागत आहेत. चीनच्या या निर्णयाचा सुमारे 25,000 भाविकांना फटका बसणार आहेत. या भाविकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.
नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने पराराष्ट्र मंत्र्यांना सांगितलं की, हा मुद्दा चीनच्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहे. नेपाळच्या मार्गे 25,000 परदेशी पर्यटक कैलाश मानसरोवरला गेले तर त्याचा फायदा देशाला होईल. 25 एप्रिल रोजी आलेल्या भयानक भूकंपामुळे आधीच नेपाळच्या पर्यटनावर परिणाम झाला आहे.

भारतीय, रशियन, मलेशियन आणि इतर युरोपियन देशांमधून आलेल्या 25,000 पर्यटकांनी नेपाळच्या 38 पर्यटन कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या यात्रेची योजना आखली होती.

परंतु चीनने भूस्खलन आणि यात्रेत येणाऱ्या संभाव्या अडचणी लक्षात घेऊन तत्तापानी, रासुवा आणि इतर क्षेत्रातील सीमा बंदी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *