काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) सकाळी वांद्रे बॅंडस्टॅंड ते धारावी अशी पदयात्रा काढली. या पदयात्रेत हजारो काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते.
काँग्रेसची ही पदयात्रा लिलावती, रिक्लेमेशन, माहीम कॉजवे, रहेजा रुग्णालय या मार्गाने पुढे गेली. धारावी येथील 90 फूट रस्त्यावर या पदयात्रेचा समोराप झाला. या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, नसीम खान आदी प्रमुख नेते सहभागी झाले होते.
मुंबईत 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्षांनी काढलेली ही पदयात्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काँग्रेसनेते वादविवाद विसरुन या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. याचा फायदा काँग्रेसला निवडणुकांमध्ये होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.