बांगलादेशकडून 178 भारतीय मच्छिमारांची सुटका

गेल्या दोन महिन्यांपासून बांगलादेशच्या कारागृहात असलेल्या 178 भारतीय मच्छिमारांची बांगलादेश सरकारने आज (मंगळवार) सुटका केली.

केंद्रीय राज्यमंत्री मॉन्तुराम पखीरा यांनी सांगितले की, बांगलादेशमधील बगरहत कारागृहात गेल्या दोन महिन्यांपासून 179 भारतीय मच्छिमार शिक्षा भोगत होते. मच्छिमार करताना सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. कारवाईदरम्यान संजय समंता या मच्छिमाराचा मृत्यू झाला होता. आज सकाळी आठ वाजता 178 मच्छिमारांची सुटका करण्यात आली. सर्व मच्छिमार हे पश्‍चिम बंगालमधील रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *