भोपाळ येथे एअर इंडियाच्या विमानाचे लॅंडिंग होत असतांना विमानाचा टायर फुटून अपगात झाला. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे समजते. ही घटना बुधवारी सकाळी घडली.
एअर इंडियाचे विमान दिल्लीहून भोपाळला आले. यामध्ये एकुण ९५ प्रवाशी प्रवास करत होते. राजाभोज विमानतळावर लॅंडिग करत असतांना अचानक या विमानाचा टायर फुटून अपघात झाला.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समजलेले नाही. या घटनेचा तपास केल्यानंतरच अपघाताचे कारण लक्षात येईल, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.