बालिकावधू’ या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेल्या प्रत्युषा बॅनर्जीने पोलिसांविरोध कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रत्युषाने पोलिसांवर विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला. त्या पोलिसांची नावे उघड करण्यात आलेली नाही.
पोलिसांच्या वेषात चारजण कारलोनच्या संदर्भात प्रत्युषाच्या कांदिवलीच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्युषाच्या मित्राबरोबर धक्काबुक्की केली. तर प्रत्युषाची छेडछाड केली.
कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी प्रत्युषाने या पोलिसांना दिल्याने ते चारजण तिथून निघून गेल्याचे प्रत्युषाने तक्रारीत म्हटले आहे.
प्रत्युषा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तिची तक्रार घेण्यास नकार दिला. अखेर अभिनेत्री डॉली बिंद्रा काही महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर पोलीस ठाण्यात गेली असता प्रत्युषाची तक्रार दाखल करून घेतली.
प्रत्युषाने कलर्स वाहिनीवरील बालिकावधू या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यानंतर ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. तसेच तिने ‘झलक दिखला जा’मध्ये ही सहभाग घेतला होता.