रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराला रविवारी सकाळी भीषण आग लागून अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले.
प्राथमिक माहितीनुसार, मिरकरवाडा बंदरालगतच्या झोपडपट्टीला सकाळी आग लागली. यावेळी दोन ते तीन झोपडय़ांमधील गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. मात्र अद्याप आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.