सावरकर, सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न द्या, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींची मागणी

सावरकर, सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न द्या, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांचाही भारतरत्न पुरस्कारानं सन्मान करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. नागपुरात सावरकर आणि हिंदूत्व या विषयावर स्वामी बोलत होते.

सत्तेत आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भाजप सरकारनं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव केला. त्यानंतर आता भाजपचेच वरिष्ठ नेते असलेल्या सुब्रमण्यम स्वामींनी ही मागणी केल्यामुळे वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांच्या मागणीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेते याबाबत काय पाठपुरावा करतात, हे पाहणं महत्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *