शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शरद जोशींचं पार्थिव सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत मुठाच्या नदी पात्रात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर अलका टॉकीज चौक मार्गे अंत्ययात्रा सुरु होईल.
गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांचा कल्याणासाठी झगडणारे नेते शरद जोशींचं शनिवारी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन झालं होतं. शरद जोशी यांच्या मुली परदेशात असल्यानं त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेतकरी चळवळीत शरद जोशी यांचं फार मोठं योगदान होतं. 2004-2010 ते राज्यसभेचे सदस्यही होते. नाशिकच्या कांदा आंदोलनाने शरद जोशी प्रसिद्धीच्या झोतात आले आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होत.