चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुमार पाटील याला अटक करण्यात आली आहे.
कुमार याचे मिनल नावाच्या तरुणीशी वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे कुटुंबियांची सहमती असल्यानं दोघं लग्नही करणार होते. मात्र, गेल्या काही दिवांपासून मिनलच्या चारित्र्यावर संशय घेवून ती आपल्याशिवाय इतर कोणावरतरी प्रेम करीत असावी असं संशयाचं भूत कुमारच्या डोक्यात घुसलं होतं.
फिरायला जाण्याच्या बहाण्यानं मिनलला अकलोलीला नेलं. तिथं एका लॉजमध्ये कुमारनं मिनलचा ओढणीनं गळा आवळून तिला ठार केलं. मिनलने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव कुमारनं सुरुवातीला रचला. मात्र, मिनलच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी तपासात कुमारनं मिनलच्या हत्येची कबुली दिली.