भारतातील कोट्यधीशांना आले ‘अच्छे दिन’

भारतातील कोट्यधीशांना आले ‘अच्छे दिन’

देशातील कोट्यधीशांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. देशात कंपन्यांच्या आणि विविध संस्थांच्या तुलनेत भारतीयांच्या वैयक्तिक उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे, असे कोटक इन्स्टिटयुशनल इक्विटिज केलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे.
 
एक कोटी रुपये आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणार्‍या भारतीयांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत तीनपट वाढ झाली आहे. 2010-11 या वर्षांत एक कोटी रुपये आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणार्‍या भारतीयांची संख्या 19 हजार 716 होती. ती संख्या 2013-14 मध्ये वाढून 63 हजार 589 वर पोचली आहे. 
 
आर्थिक वर्ष 2013 मध्ये चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी व्यक्तीचे वैयक्तिक उत्पन्न 1 कोटी किंवा त्याहून अधिक असल्यास त्यावर सरसकट 10 टक्के अधिभार लावला होता. आता सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा अधिभार कायम ठेवला आहे. कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजच्या अहवालानुसार आणि आकडेवारीनुसार, सध्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 0.5 टक्के नागरिक कोट्यधीश आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *