1990 साली कार सेवेदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेले राम कोठारी आणि शरद कोठारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, ‘माझ्या हयातीतच मंदिराची उभारणी व्हावी. ज्यामुळे आम्ही आमच्या डोळ्याने मंदिर पाहू शकू. मंदिर उभारणीबाबत कोणी काहीही बोलत नाही. मात्र आपल्याला त्यासाठी तयारी करून सज्ज रहायला हवे. आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करायला हवे. राममंदिर उभारणीसाठी ‘जोश‘ आणि ‘होश‘ आवश्यक आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर हे त्यांच्या आर्थिक सक्षमतेचे प्रतिक असल्याने दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला. त्याप्रमाणे अयोध्येतील राममंदिर हे भारताच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. त्यामुळेच त्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. आपण दुबळे असल्याने काहीही करू शकत नाहीत.‘, असेही भागवत पुढे बोलताना म्हणाले. यावेळी त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
माझ्या हयातीतच राममंदिर व्हावे- मोहन भागवत

अयोध्या येथील रामजन्मभूमीत माझ्या हयातीतच राममंदिर उभारावे, अशी इच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे.