फलंदाजी क्रम निश्चित नाही

फलंदाजी क्रम निश्चित नाही

टीम इंडियात कुठल्याही फलंदाजाचा क्रम निश्चित नाही. संघाच्या गरजेनुसार सहकाऱ्यांनी कठल्याही स्थानावर खेळण्याची तयारी ठेवायला हवी, असे कर्णधार विराट कोहली याने नागपुरात २५ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या कसोटीपूर्वी स्पष्ट केले.

मोहाली कसोटीत चमकदार कामगिरी करीत डिव्हिलियर्सला बाद करणाऱ्या अमित मिश्रा याला दुसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाबद्दल विचारताच विराट म्हणाला,‘खेळाडूच्या प्रतिभेनुसार सामन्यात त्याला संधी द्यावी लागते. परिस्थिती ओळखून कुठला खेळाडू त्या परिस्थितीत अधिक सक्षम आहे याचे भान राखावे लागते.’

आमच्या संघात लवचिकता आहे. गेल्या काही सामन्यात अमितने चांगला मारा केला हे माहिती आहे पण बेंगळुरू सामन्यात त्याची गरज नव्हती. तेथील परिस्थितीत बिन्नीची अधिक गरज असल्याचे माझे मत असल्याचे विराटने स्पष्ट केले. भारताकडून पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत शून्यावर बाद झालेला सलामीचा शिखर धवन याच्या फॉर्मबद्दल कोहलीने चिंता व्यक्त केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *