बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांच्या गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलीस कुटुबियांचा हक्काच्या घरचा प्रश्न सुटला आहे. बीडीडी चाळीतील घरं पोलिसांच्या मालकीची होणार आहेत. याबाबतची घोषणा राज्याच्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली आहे.
बीडीडी चाळीतील घरांचे मालकी हक्क पोलिसांना देण्यास काहीही हरकत नसल्याचं प्रतिज्ञपत्र राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी कोर्टात सादर केलं होतं. त्यानंतर कोर्टाने सरकारला विचारलं होतं, घरांचे मालकी हक्का पोलिसांना कोणत्या आधारावर देणार आहात. मात्र, अखेर बीडीडी चाळीचा पुनर्विकास करुन मालकी हक्कासह घरं पोलिसांच्या स्वाधीन केली जातील, अशी घोषणा स्थानिक पोलिसांची बैठक घेऊन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी घोषणा केली.
बीडीडी चाळीत पोलिसांच्या दोन ते तीन पिढ्या राहतात. या घरांचे मालकी हक्क मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पोलिस कुटुंबिय प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.