पोलिसांनी सामान्य नागरिकांकडून कायद्याचं पालन करण्याची अपेक्षा असताना जालन्यात चक्क पोलिसांनीच कायद्याला हरताळ पाळल्याचं उदाहरण समोर आलं आहे. जालन्यात पोलिस वसाहतीतच वीजचोरी सुरु असल्याचं उघड झालं आहे.
जालना जिल्हा पोलीस मुख्यालय कर्मचारी वसाहतीत उघडपणे ही वीज चोरी सुरु आहे. विजेच्या खांबावरुन वायर टाकून पोलीस वसाहतीतील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या घरात विजेचे कनेक्शन घेतले आहेत.
विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांपासून हा चोरीचा प्रकार सर्रास सुरु असूनही कोणीच याविरोधात आवाज उठवलेला नाही. शासनाचा एक विभाग उघडपणे दुसऱ्या विभागावर डल्ला मारत आहे, मात्र असं असूनही वीज वितरणानं यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.