आंध्रात पावसामुळे भिंत कोसळून 5 मुलांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील कडाप्पा जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांत पाच मुलांचा मृ्त्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कडाप्पा जिल्ह्यातील बोयापल्ली येथे पावसामुळे एका जुन्या इमारतीचे छत कोसळले. याठिकाणी चार मुळे खेळत होती ती ढिगाऱ्याखाली अडकली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर, लक्ष्मीगिरी पाली गावात घराची भिंत कोसळून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
 
आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तमिळनाडूला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *