संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आभार फाटल्यासारखी स्थिती आहे. पुणे आणि साताऱ्या जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. खबरदारी म्हणून NDRF चे पथक देखील दाखल झाले आहे. मुंबईत तर पावसामुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यंदा पावासने 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.
मागील चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. साताऱ्यातील संगम माहुली येथील नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात सध्या वाढ झालेली आहे.
पुणे जिल्ह्यात पावसानं थैमान घातले आहे. पुण्यात मे महिन्यातील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर, बारामती, दौंडला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारामती आणि दौड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा कालवा फुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NDRFच्या दोन टीम परिसरात तळ ठोकून आहेत.
मुंबईत झालेल्या पावसाने 107 वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. मे महिन्यात मुंबईत 107 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस पडला आहे. ज्याने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. मुंबईत मान्सूनने नवा विक्रम केलाय. 16 दिवस आधीच मान्सून मुंबईत दाखल झालाय. 11जूनला दाखल होणारा मान्सून यंदा 26 मेरोजी दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. यापूर्वी 29 मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता.
1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत पावसाचे आगमन झाले होते.
मुंबईत झालेल्या पावसाची नोंद
कुलाबा – 105.2 मिमी
सांताक्रूझ – 55.0 मिमी
वांद्रे – 68.5 मि.मी
जुहू विमानतळ – 63.5 मिमी
टाटा पॉवर चेंबूर – 38.5 मि.मी
विक्रोळी – 37.5 मि.मी
महालक्ष्मी – 33.4 मिमी
सायन – 53.5 मिमी