पाकिस्तानविरोधात भारताचे ऑपरेशन ‘केलर’; सर्वात मोठ्या दहशतावद्याचा खात्मा

जम्मू – भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविरामची घोषणा करण्यात आलीआहे. यानंतर 48 तासांत दक्षिण काश्मीरातील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. यात लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.  या ठिकाणी ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

13 मे रोजी शोपियानातील केलर इथल्या जंगलात सुरक्षा दलाने ही कारवाई केली. सीमेवरील गोळीबार बंद होताच सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु केले.  शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात चकमक झाली. यात लश्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहीद कुट्टे आणि अदनान शफीसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आले.  यातील तिसरा दहशतवादी अहसान-उल-हक शेख हा पुलवामातील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून दारुगोळा, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यात एके 47, मॅगजीन, ग्रेनेड आणि अन्य शस्त्रांचा समावेश आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *