युद्धाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात टंगळ-मंगळ करत फिरतात’; संजय राऊत यांचं टीकास्त्र

काश्मीरच्या पेहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये घडलेल्या भीषण हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारसभांमध्ये रमले आहेत,” अशी तीव्र टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

“देशात युद्धाची चर्चा सुरु आहे, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली जात आहे, पण मोदी सरकारच्या कृतीत मात्र गांभीर्याचा अभाव दिसतो. एकीकडे राष्ट्रीय मीडिया युद्धाचे ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे मोदी सेलिब्रिटींसोबत मुंबईत उपस्थित राहतात. गौतम अदानी यांच्या कार्यक्रमाला जातात, मिठ्या मारतात. हा दुजाभाव का?” असं म्हणत संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

“गृहमंत्री अमित शहा यांनी ‘घरात घुसून मारू’, ‘चुन चुनके मारेंगे’ अशी भाषा केली होती, पण आज काश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांडानंतरही कुठले ठोस पाऊल सरकारकडून दिसलेले नाही. अमित शहा यांना जबाबदार धरले पाहिजे, आणि विरोधी पक्षांनी त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले.

अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अमित शहा चालवतात. शरद पवार जाणार आहे का नाही हे मला माहिती नाही. महाराष्ट्राशी गद्दारी केलेल्यांच्या कार्यक्रमाला का जायचं. आम्ही अमित शहाच्या पक्षाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत… उद्धव ठाकरे परदेशात असो किंवा मुंबईत आम्ही जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप सोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर भाजपचे मुख्यमंत्री होते हे कदाचित भविष्यात होईल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

घरात घुस मारू ही भाषा केली अमित शहा म्हणाले चून चूनके मारेंगे, अडवले कोणी आहे. काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला फक्त अमित शहाच जबाबदार आहेत. मोदींनी तरी त्यांना त्या पदावर का ठेवल हे रहस्य आहे. विरोधी पक्षाविषयी मला कीव येते त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागेला पाहिजे, पाठिंबा कसा देत आहे, असा सवाल करत विरोधकांवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *