मुंबई पोलिसांकडून 5 महिलांसह 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक

मुंबईतील शिवाजी नगर आणि आरसीएफ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मुंबईतील गोवंडी आणि चेंबूर या भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 17 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. गोवंडी आणि चेंबूरमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुंबई पोलिसांना मिळाल्या असून, त्याअंतर्गत आता त्यांच्यावर विशेष कारवाई करण्यात आली आहे.

अवैध बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. प्रत्येक टीमला एका विशिष्ट क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे. जिथे त्यांनी सखोल तपास केला आणि बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *