बायकोला मिठी मारली अन् गोळी झाडली, त्याच गोळीनं नवऱ्याचाही अंत; चक्रावून टाकणारा घटनाक्रम

मोबाईल हरवला, गळाभेट घेतली, एक गोळी झाडली अन् एकाएकी चार मुलं अनाथ झाली… कुटुंबात आक्रोश सुरू झाला. ही हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडली आहे. एक गोळी झाडली गेल्यानं पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घटना नेमकी कशी घडली ते अनेकांना समजलं नाही. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले.मुरादाबादच्या बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खानपूरात अनेक पाल त्याची पत्नी सुमन आणि चार मुलांसोबत राहायचा. मजुरी करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. एका लग्न सोहळ्यात त्याचा मोबाईल हरवला. त्यावरुन अनेक आणि सुमन यांच्यात वाद झाला. वाद सुरू असताना अनेकनं सुमनला मिठी मारली. त्यानं पत्नीच्या पाठीत गोळी झाडली. पिस्तुलातून सुटलेली गोळी पत्नीच्या पाठीतून आरपार गेली आणि अनेकला लागली. एकाच गोळीनं पती, पत्नीचा जीव गेला. दाम्पत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात आक्रोश सुरू झाला. आई, वडिलांच्या मृत्यूनं चार मुलं अनाथ झाली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नातेवाईक आणि शेजाऱ्यांची चौकशी सुरू आहे.’गोळी लागल्यानं पती, पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला १३ जूनच्या मध्यरात्री मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांमध्ये कायम वाद व्हायचे अशी माहिती नातेवाईक आणि मुलांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाद सुरू होते. मंगळवारी रात्रीदेखील दोघांमध्ये वाद झाला. या दरम्यान अनेक पालनं देवपूजा केली. त्यानंतर पत्नीची गळाभेट घेतली. त्यानं पत्नीच्या पाठीवर गोळी झाडली. ती गोळी तिच्या शरीरातून आरपार गेली. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या कुटुंबियांनी कोणावरही आरोप केलेले नाहीत,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप कुमार मीणा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *