सुदानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत यादवी युध्दामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून बाराशे किलोमीटरवर हे नागरीक अडकले आहेत.
सुदान मध्ये गृहयुध्द सुरू असल्याने अनेक भारतीय नागरिक सुदान मध्ये अडकले आहेत. परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकाना मायदेशी आणले जात असून आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र अनेक लोक सुदान मध्ये अजूनही अडकून आहेत. यात सांगली जिल्ह्यातील ८० ते १०० च्या आसपास नागरिक अजूनही सुदान मध्ये असून यातील काहींना मायदेशात यायचे आहे पण सुदान मधील भारतीय दुतावासाने मायभूमीत आणण्यासाठी निश्चित केलेले ठिकाण हजार ते बाराशे किलोमीटरवर आहे.
