दिवाळीनंतर भाजीपाला झाला स्वस्त

भाज्यांची आवक वाढू लागल्याने वांगे, टोमॅटो, गवार पालकाच्या भावात घसरण झालेली आहे. थंडीचे दिवस जवळ येऊ लागले असून शेतातील पिकही चांगले वाढू लागले आहेत. त्यामुळे वांगे, टोमॅटोसह सर्वच भाज्यांची आवक वाढू लागली आहे.

गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ बघायला मिळाली होती. दिवाळीपर्यंत हे दर चढे होते. परंतु, दिवाळी झाल्यानंतर आवक वाढली असून, भाजीपाल्यांचे दरही कमी झाले आहेत. गेल्या महिन्यात दिडशेपार गेलेली गवार आता ६० रुपये किलोवर आली आहे. शिमला मिरचीही ४० रुपये किलोपर्यंत आली आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी घसरले आहेत. मेथीचे दर मात्र चढेच आहेत. पावसामुळ‌े पालेभाज्यांचे अधिक नुकसान झाले होते. त्यामुळ‌े पालेभाज्यांची आवक घटली होती. परिणामी, किमतीतही मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले होते. या आठवड्यात पालेभाज्यांचेही दर घसरले असून, २५ ते ३० रुपये जुडी झाले आहेत.पालेभाज्यांचे दर ( दर प्रतिजुडी)

मेथी : ३० ते ४०

अळू : २० ते २५

कांदापात : ३०

पालक : २० ते २५

शेपू : २० ते २५

कोथिंबीर : १० ते २०

फळभाज्यांचे दर (दर प्रतिकिलो)

गवार : ६०
डांगर : ४०

भेंडी : ४०

कारले : ४०

हिरवी मिरची : ६०

वांगी : ४० ते ६०

शेवगा : ८०

बटाटा : २५ ते ३०

गिलके : ४०

दोडके : ४०

शिमला मिरची : ४०

कोबी : २० ते ३० प्रतिनग

फ्लावर : २० ते ३० प्रतिनग

परतीच्या पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटून किमतीतही वाढ बघायला मिळाली होती. या आठवड्यापासून आवक पुन्हा वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. सर्वच भाज्यांचे दर पाच ते दहा रुपयांनी घटले आहेत.

– रमाकांत मुकनर, भाजीपाला विक्रेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *