पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात एक लहान बोट बुडून तीन भावांचा मृत्यू झाला. हे तीन भाऊ व त्यांचा चुलतभाऊ असे चौघे गंगा नदीच्या काठावरील ताग कापण्यासाठी बुधवारी दुपारी एका लहान बोटीत बसून जात असताना नदीच्या मध्यभागी ही बोट बुडाली. कार्तिक मंडल (२५) याने पोहत किनाऱ्यावर येऊन स्वत:चा जीव वाचवला, मात्र सुब्रत मंडल (१८) व त्याचे भाऊ सत्यजित (२२) आणि सत्यवान(२०) हे दोगे बेपत्ता झाले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
सुब्रत व सत्यजित यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी, तर सत्यवानचा मृतदेह दुपारी सापडला, असे कालियाचकचे खंडविकास अधिकारी मामून अख्तर यांनी सांगितले.
मरण पावलेले तिन्ही भाऊ बैशाबनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन मंडल पारा येथील रहिवासी आहेत.