मुंबईचा पाणीपुरवठा बंद;

संकुलातील उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरु होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो.

मुंबईला ज्या धरणांतून पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या सर्व धरणांतील पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुलात करुन पुढे मुंबईकरांना पुरवठा केले जाते. मुंबईला दरदिवशी 3800 दशलक्ष लिटर अर्थात 380 कोटी लिटर पण्याचा पुरवठा केला जातो. पण रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची भांडुप संकुल परिसरात अधिक नोंद झाली. त्यामुळे हे संकुल पाण्याखाली गेले असून, पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. हे पाणी उपसण्याचे काम सध्या सुरू आहे.

सध्या पाणी उपसण्याचे काम सुरु आहे, ते झाल्यानंतर पंप सुरु केले जातील. जर हे काम लवकर झाल्यास उशिरा मुंबईला पाणीपुरवठा केला जाईल, असे महापालिकेनं स्पष्ट केले आहे.

मुंबईला तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांतून पाणीपुरवठा होतो. या धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे 15 लाख दशलक्ष लिटर आहे. मुंबईची पाण्याची दररोजची मागणी 4 हजार 450 दशलक्ष लिटर असून प्रत्यक्षात 3 हजार 750 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *