चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात दिसून आला. यावेळी मुंबईसह अनेक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कोकणात झालेल्या चक्रीवादळाच्या वादळाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू. तर रत्नागिरीत दोघांचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका खलाशाचा मृत्यू झाला, तर मुंबईत वरळी येथे झाडाची फांदी पडून महिलेचा मृत्यू झाला तर नवी मुंबई विद्युत खांब पडून तरुणाचा मृत्यू झाला आणि उल्हासनगरमध्ये झाड पडल्याने दोन जणांचा मृत्यू. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी बुडाल्या ज्यावर 7 खलाशी होते. त्यातील तीन जण बेपत्ता झालेत.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वानखेडे स्टेडियमची स्टँड आणि साइट स्क्रीन कोसळली आणि खाली पडली. वानखेडे स्टेडियमच्या स्थिती पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही, इतकी वाईट अवस्था झाली आहे. याबाबत ट्विटरवर वानखेडे स्टेडियमच्या नुकसानीचे फोटो शेअर करत लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
