कौटुंबिक वादातून महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

औरंगाबादजवळील गेवराई तांडा परिसरात एका महिलेने दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

वैशाली रवींद्र थोरात (वय २५), अनुष्का (वय ४) व आयुष (वय २) अशी मृतांची नावे आहेत. तर रवींद्र सुधाकर थोरात, असे वैशालीच्या पतीचे नाव आहे, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली आहे.

उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले आहेत. रमाईनगरमध्ये मृत वैशालीचे माहेर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *