गाडीला फास्टॅग अनिवार्य

 गाडीला फास्टॅग अनिवार्य

मुंबईतील 5 पैकी 4 टोलनाक्यांवर सेंसर लावण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत विना फास्टॅग गाडीला टोला नाका क्रॉस करता येणार नाही.

मुंबईतील दहिसर टोलनाका सोडता अन्य चार ठिकाणच्या टोल नाक्यावरील सेंसर तसंच इतर तांत्रिक कामे पूर्ण झाली आहेत. विना फास्टॅग वाहनांनी फास्टॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येतो. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू झालंय. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होतो. टोलनाके कॅशलेस झाल्याने तसेच फास्टॅगच्या येण्याने कर्मचाऱ्यांसोबतच वाहनचालकांचा देखील वेळ वाचणार आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी तसेच नसण्याच्या बरोबरच होईल. आपत्कालिन स्थितीत कोणालाही टोल नाक्यांवरील रांगेत राहण्याची गरज नसेल. फास्टटॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर  फास्टटॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *