करोनाने रोज ‘किती’ मुंबईकर मृत्यूमुखी पडतात?

मुंबईत करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. तर, एकीकडे करोनामुळं होणाऱ्या मृतांचे प्रमाणही वाढत चाललं आहे. अशातच एक मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. जुनमधील पहिल्या ९ दिवसांत दरदिवशी सरासरी ५३ मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तुलनेत मे महिन्यांतील पहिल्या ९ दिवसांत हे प्रमाण ४१ होतं. मे महिन्याच्या तुलनेत जुनमध्ये करोनामुळं होणाऱ्या मृतांचे प्रमाणं ३० टक्क्यांनी वाढले असल्याचं  सांगितले आहे.

जूनमध्ये मुंबईत ४८१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर, १ जून रोजी ४० जणांचा मृत्यू करोनामुळं झाला होता. तर, त्यानंतरच्या ३ दिवसांत ५० जणांचा मृत्यू झाला. या आठवड्यात मुंबईत करोनाबाधितांच्या मृत्यूनं उच्चांक गाठला असून सोमवारी तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला.

तर एकूणच मुंबईतील रोजची रूग्णवाढ आणि मृत्यू दर खाली येऊ लागला आहे. सोमवारी रूग्णदर ३.५. टक्के तर मृत्यू दर तीन टक्क्यांपर्यंत आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्येने ५० हजारांचा आकडा पार केला आहे.

मुंबईची दैनंदिन रूग्णवाढ ३.५ आली आहे तर भायखळा आणि माटुंगा-शीव-वडाळा परिसरात १.६ इतकी नोंदवली आहे. ई विभागात भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा अशा दाटीवाटीच्या लोकवस्तीचा परिसर येतो. त्यामुळे या भागात नागरिकांचा जवळून संपर्क आल्याने एप्रिल आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *