तेलंगणात २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला

 तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी २९ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवणारं तेलंगण हे पहिलं राज्य ठरलं आहे. तसंच राज्यात संध्याकाळी ७ वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आलीय, अशी माहिती मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिली. तेलंगण सरकारच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारही लॉकडाऊन वाढवू शकतं, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना त्यासाठी आवश्यक दिशानिर्देशही जारी केले आहेत. नागरिकांनी संध्याकाळी ६ वाजेच्या आत आवश्यक साहित्य घ्यावे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करताना कुणी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशाराही राव यांनी दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी राव यांनी पोलिसांना मोकळीक दिली आहे.

तेलंगणमध्ये १००० हून अधिक रुग्ण
तेलंगणमध्ये एकूण १०८५ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. तर २५ हून अधिक नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे. अनेक जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलं आहे.
कंटेन्मेंट झोनमधील १५ दुकानं वगळता राज्यातील २२०० दारू दुकानं खुली राहतील. महागड्या दारूवर १६ टक्के तर स्वस्त दारूवर ११ टक्के कर लावण्यात आला आहे. दारू दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास कारवाई होईल, असं मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *