पालघर जिल्ह्यात ४०७ परदेशी प्रवासी

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सोमवारपर्यंत परदेशातून भारतात आलेल्या प्रवाशांपैकी ४०७ प्रवासी पालघर जिल्ह्यात आले असून १०८ प्रवाशांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. १४ प्रवाशांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आली असता, त्या सर्वांचे नमुने तपासणी करता पाठवविण्यात आले. त्यापैकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.

जिल्ह्यात परदेशातून आलेल्या सर्वात जास्त प्रवासी वसईतील आहेत. ही संख्या २०५ आहे. यातील ५८ प्रवाशांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांना करोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले. वसई ग्रामीण विभागात ६५ प्रवासी परदेशातून आले असून त्यातील चार प्रवाशांनी १४ दिवस पूर्ण केले. पालघर तालुक्यात ८० प्रवासी परदेशातून आले आहेत. त्यातील २९ प्रवाशांचे १४ दिवस पूर्ण झाले असून आठ प्रवाशांमध्ये लक्षणे आढळून आली. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. डहाणू तालुक्यात २९ प्रवासी परदेशातून आले आहेत. त्यातील सहा प्रवाशांमध्ये लक्षणे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणी गेले असता ते निगेटिव्ह आढळून आले. वाडा तालुक्यात २१ प्रवासी परदेशातून आले आहेत. त्यातील नऊ जणांनी १४ दिवस पूर्ण केले. एका प्रवाशात लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने तपासणी गेले असता त्याला करोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले. विक्रमगड तालुक्यात चार प्रवासी परदेशातून आले असून एका प्रवाशाने १४ दिवस पूर्ण केले आहेत. कोणामध्येही करोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. तलासरी तालुक्यात तीन प्रवासी परदेशातून आले. कोणामध्येही करोनासदृश्य लक्षणे आढळली नाहीत. जव्हार तालुक्यात एक प्रवासी परदेशातून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *