मुंबई येथून पर्यटनासाठी रोहा तालुक्यात आलेल्या पर्यटकांपैकी विठ्ठलवाडी गावानजिक असणाऱ्या बल्हे येथील नदी पत्रात तीनजण बुडाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहा येथील स्थानिक रहिवासी संकेत पवार हे त्यांच्या मुंबईतील काही मित्रांसह फिरण्यासाठी रोह तालुक्यात आले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास कुंडलिक नदीत हे मित्रमंडळ उतरले होते. एकूण २८ जणांचा ग्रुप फिरण्यासाठी आला होता. त्यातील ३ जण बुडाल्याचे समजते. महेश जेजुरकर, परेश जेजुरकर आणि अक्षय शालिग्राम अशी बुडालेल्या तिघांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस, राफ्टिंगपथक आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलीस आणि बचाव पथकांनी या तिघांचा शोध सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
