उत्तर प्रदेशात विषारी दारूचे १२ बळी; चौकशीचे आदेश

राणीगंज आणि जवळच्या गावांतील काही स्थानिक रहिवाशांनी रामनगर भागातील एका दुकानातून सोमवारी रात्री दारू विकत घेतली होती. रात्री दारू प्यायल्यावर मंगळवारी पहाटेपासूनच त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्या सर्वांना रामनगर आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यांपैकी १२ जण मृत्युमुखी पडले. १६ जणांना लखनौ येथील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. ते सर्व जण सध्या डायलीसिसवर आहेत. दरम्यान, सुमारे सहा जणांना बलरामपूर येथे आणि लखनौ येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्याच्या महसूल आयुक्तांनी आणि सह व उपायुक्तांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

बारा जण निलंबित

बाराबंकीचे जिल्हा महसूल अधिकारी शिव नारायण दुबे, महसूल निरीक्षक रामतीर्थ मौर्य, तीन मुख्य हवालदार, आणि महसूल विभागातील पाच हवालदारांना नोकरीतून निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस सर्कल अधिकारी पवन गौतम आणि स्टेशन हाउस ऑफिसर राजेशकुमार सिंह यांनाही निलंबीत करण्यात आले आहे.

उच्चस्तरीय समिती

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीत आयुक्त, अयोध्येचे पोलिस महासंचालक; तसेच महसूल आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. या घटनेमागे राजकीय कारस्थान आहे का, याचा अभ्यास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *