१५ तृतीयपंथी अडकणार लग्नाच्या बंधनात

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच १५ तृतीयपंथ्यांचा सामूदायिक विवाह सोहळा पार पडणार असून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या विवाहसोहळ्यात तृतीयपंथ्यांचं कन्यादान करणार आहे. २९ आणि ३० मार्चला १५ तृतीयपंथी आणि १५ पुरूष लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

सप्टेंबर २०१८मध्ये समलैंगिकता गुन्हा नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारचा सामुहिक विवाहसोहळा भारतात पार पडतो आहे. या १५ जोडप्यांमधील ६ जोडपी छत्तीसगडमधील आहेत तर उरलेली ९ जोडपी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील आहेत. मुंबईतील चित्राग्रही फिल्मस ही कंपनी या विवाहसोहळ्याचे आयोजन करत आहे. ‘ लैंगिक समतेकडे टाकलेले हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. इतिहासात पहिल्यांदाच असा सोहळा घडतो आहे’ अशा शब्दात तृतीयपंथी नेत्या विद्या राजपूत यांनी या सामुहिक विवाह सोहळ्याचं कौतिक केलं आहे. १५ तृतीयपंथ्यांचे कन्यादान छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *