भुसावळमध्ये स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू?

भुसावळ शहरातील शांतीनगर भागातील गजानन नगरमधील दोन व्यक्तींचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. नगरपालिकेच्या डॉक्टरांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनीसुद्धा याबद्दल दुजोरा दिला आहे.

भुसावळ शहरातील शांतीनगर भागातील गजानन नगर येथे राहणारे वीरेंद्र सुभाष चौधरी (वय ४५) वनिता तळेले (वय ५८) या दोघांचे स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. वीरेंद्र सुभाष चौधरी यांचा मृत्यू दि. २५ जानेवारी रोजी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये झाला. याबाबत नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून, याची अधिकृत घोषणा संबधित हॉस्पिटल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्दी, खोकला अशी लागण झालेल्या नागरिकांनी नगरपालिका दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. भुसावळ शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी नागरिकांना माहितीपत्रके वाटून स्वाइन फ्लूबाबत जनजागृती केली. दरम्यान, १४ फेब्रुवारीपर्यंत भुसावळ शहरात स्वाइन फ्लू जनजागृती पंधरवडा मोहीम राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *