केमिकल गळतीमुळे कल्याणमधील माणसाची दृष्टी गेली

कल्याणमधील एका रस्त्यावर टॅंकरमधील विषारी रसायन मागील स्कुटीवर बसलेल्या गौरेश साळस्कर त्यांची पत्नी गौरी आणि मुलगा तनिषच्या अंगावर पडून स्कुटी चालवणाऱ्या गौरेशच्या उजव्या डोळ्याची दृष्टी गेली आहे . तर गौरी आणि तनिषचेही हात पाय भाजले आहेत.

चक्की नाक्याजवळ टॅंकर एका खड्ड्यातून पुढे जात असताना त्याच्या टपावरचे झाकण उघडे राहिल्यामुळे टॅंकरमधील रसायन मागून येणाऱ्या गौरेश ,गौरी आणि तनिषच्या अंगावर पडले. काही कळण्याच्या त्या रसायनाचा दोन-तीनदा वर्षाव झाला. डोळ्यात ते रसायन गेल्यामुळे गौरेशला प्रचंड वेदना झाल्या आणि त्याने किंकाळी फोडून गाडीचा ब्रेक दाबला. एका जोडप्याने लगेच तिघांना जवळच्या इस्पिताळात दाखल केलं. तिथे तनिषच्या जखमा लगेच भरल्या आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला. गौरी साळस्कर यांच्यावर तिथेच उपचार सुरू असून गौरेश साळस्करांवर मात्र डॉ. तात्याराव लहाने जे.जे. रुग्णालयात उपचार करत आहेत.

डॉ लहाने म्हणाले, ‘मोठ्या प्रमाणात रसायन डोळ्यात पडल्यामुळे गौरेशच्या डोळ्याचा पडद्यावर परिणाम झाला आहे. त्याच्या डोळ्याची बाहुली पूर्णपणे पांढरी पडली असून त्याला उजव्या डोळ्याने काहीच दिसत नाहीय. जर नीट उपचार केल्यास येत्या सहा महिन्यांत गौरेशला त्याची दृष्टी काही अंशी परत मिळण्याचीही शक्यता आहे.’ डायमंड कंपनीत सेल्समन असलेल्या गौरेशची पत्नी गौरी हिचा चेहराही थोडासा भाजला आहे.दरम्यान ते रसायन कोणतं होतं आणि टपावरचे झाकण उघडे ठेवून गाडी चालवणारा तो निष्काळजी टॅंकर ड्रायव्हर कोण होता याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *