रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे आज एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. खंडाळा घाटात रेल्वेचा रुळ तुटला असल्याचे सुनीलकुमार या रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. परिणामी या मार्गावरून जाणार असलेली मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस थांबवण्यात आली आणि मोठा अपघात टळला. सुनीलकुमार यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *