पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा

शहरात पुन्हा तीन दिवसाआड पाणी पुरवठा  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘एमआयएम’च्या नगरसेवकांनी शुक्रवारी आंदोलन केल्यावर महापालिकेच्या आयुक्तांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळेल.

शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य जून महिन्यात स्थायी समितीचे सभापती झाले आणि त्यांनी दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा ‘टास्क’ हाती घेतला. आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेवून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. टप्प्या टप्प्याने संपूर्ण शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचेही जाहीर करण्यात आले. मात्र, शुक्रवारी ‘एमआयएम’च्या नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनामुळे पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *