रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील कळबणी बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३३ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झालीय. यातील २३ विद्यार्थ्यांवर उपचार करून सोडून देण्यात आलं. १० विद्यार्थ्यांवर अजूनही कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोषण आहार खाल्यानंतर विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागलं… तसेच उलट्या आणि डोकं देखील दुखू लागल्याने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना खेडच्या कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे सर्व विद्यार्थी पहिली ते सातवीतील आहेत. या घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे.