यवतमाळमध्ये वीज कोसळून महिला ठार

मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून एक महिला ठार झाली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वडकी खैरी येथे घडली. मंदाबाई नानाजी सुरपाम असे मृत महिलेचे नाव आहे. मंदाबाई या बकऱ्या चारण्यासाठी विरूळ शिवारात गेल्या होत्या. या वेळी त्यांच्यावर वीज कोसळली.

वडकी खैरीला पावसाचा फटका

दरम्यान, या पावसाचा वडकी खैरी येथे चांगलाच फटका बसला. अनेक भागात पाणी साचले. तर, काही ठिकाणी वाहने पाण्यात आडकली. काही ठिकाणी शेतमालाचेही नुकसान झाले. नागरिकांची तारांबळ उडाली तर, शालेय विद्यार्थ्यांनाही पावसामुळे विलंब झाला.

पावसाने मारली दडी

दरम्यन, जोमदार सुरूवात करणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. अपवाद वगळता राजधानी मुंबईसह राज्यभरात हे चित्र दिसत आहे. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्य़ांनी पेरणी केली खरी. पण, आता पावसाने दडी मारल्यामुळे सर्वांचेच लक्ष पावसाकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *