केरळमध्ये पावसाचा कहर; भूस्खलनात ४ ठार

केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एका गावात झालेल्या भूस्खलनात तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, १० जण बेपत्ता आहेत. मागील काही दिवसांपासून केरळमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

मे महिन्यात मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. थामारास्सेरी तालुक्यातील कट्टीपाडा गावातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, बेपत्ता झालेल्या लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भूस्खलनात झालेल्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलप्पुरम, कन्नूर, वायनाड आणि कासारगोड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *