काय आहे विराटचं फॅमिली प्लानिंग?

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विवाह झाल्यानंतर क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं प्रथमच त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे. फॅमिली प्लॉनिंगबद्दलही त्यानं बिनधास्त मत मांडलंय. ‘प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मी लग्न केलंय. आता माझं कुटुंब आहे. भविष्यात आम्हाला मुलंही होतील,’ असं त्यानं म्हटलंय.
एका मुलाखतीमध्ये बोलताना विराटनं ही मतं मांडली आहेत. ‘प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी घडत असतात. तसंच माझ्या बाबतीत होईल,’ असं त्यानं म्हटलं आहे. ‘बाबा झाल्यानंतर मला माझा संपूर्ण वेळ मुलांसाठी द्यायचा आहे. मी मिळवलेल्या यशाचं दडपण माझ्या मुलांवर येऊ नये, असं मला वाटतं. त्यामुळंच मुलं मोठी होत असताना क्रिकेटपटू म्हणून मी मिळवलेली बक्षीसं, ट्रॉफीज घरात ठेवणार नाही,’ असं त्यानं सांगितलं.

अनुष्काचंही त्यानं भरभरून कौतुक केलं. ‘अनुष्का माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. तिच्या सहवासात मला अनेक गोष्टींची नव्यानं जाणीव झाली. क्रिकेटच्या मैदानावर मी कॅप्टन असलो, तरी घरात अनुष्काच कॅप्टन आहे. घरातील बरेच निर्णय तीच घेते,’ असंही विराट म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *