मेघाने केला राजेशवर ‘हा’ आरोप

बिग बॉसच्या घरात सतत आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. मेघा धाडेने असाच आरोप अभिनेता राजेश शृंगारपूरेवर केलाय. ‘घरातील वातावरण कलुषित करण्यात राजेशचा फार मोठा वाटा आहे. तो घराबाहेर पडल्याने अचानक वातावरण बदललं असून प्रत्येक जण एकमेकांशी आता बोलायला लागले आहेत’ असं मेघा म्हणाली.

बिग बॉसच्या घरात दर आठवड्याला एक स्पर्धक बाहेर जातो आणि घरातील समीकरणं बदलतात. परंतु, राजेश घराबाहेर पडल्याने सगळे चित्रच पालटल्याचे मेघाचे म्हणणे आहे. मेघाने ही गोष्ट पुष्कर जोग आणि सई लोकुर या तिच्या मित्र – मंडळींना बोलूनही दाखवली. ‘राजेश घरात असताना त्याची एक प्रकारची दहशत होती आणि त्यामुळे कोणी एकमेकांशी बोलायचेदेखील नाही. परंतु, तो बाहेर पडल्याने वातावरण एकदम पालटलं. घरातील सदस्यांनी मोकळेपणाने एकमेकांशी बोलायला सुरूवात केली.’ असं मेघा म्हणाली. आपल्या मैत्रिणीच्या या मताला सईनंदेखील दुजोरा दिला. ‘राजेशच्या घराबाहेर जाण्यामुळे पहिल्यांदाच आपापले गट सोडून सदस्य एकमेकांशी चांगलं बोलले, एकत्र मिळून- मिसळून बसले, गप्पा मारल्या’ असं सई म्हणाली. पुष्करला मात्र असं वाटत असून त्याने इतक्यात कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला.

बिग बॉसच्या घरातून गेल्या आठवड्यात अभिनेता राजेश शृंगारपुरे बाहेर पडला. परंतु, घरातून जरी तो बाहेर पडला असला तरी गेममध्ये मात्र तो अजूनही टिकून आहे. सध्या सिक्रेट रूममध्ये बसून तो सदस्यांना पाहतोय. त्यामुळे, राजेश घरी परतल्यावर नेमकं काय होईल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *