आजपासून रस्ता सुरक्षा अभियान

२९व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाला आज, सोमवारपासून ठाण्यात सुरुवात होत आहे. त्यानिमित्त ठाणे आरटीओ कार्यालयाच्यावतीने चालकांची आरोग्य तपासणी, रिक्षा चालक तसेच शिक्षकांची कार्यशाळा, वाहन तपासणी, बाइक रॅली, रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती आदी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

२३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत हे अभियन राबवले जात असून खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अभियानातर्गत वाहनांमधील तांत्रिक दोषाबाबत तपासणी मोहीमही हाती घेतली जाणार आहे. तसेच विविध टोलनाके आणि शिबिराच्या ठिकाणी रस्तासुरक्षा विषयक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हेल्मेट, सीटबेल्ट तपासणी मोहीम राबवली जाणार असून अपघाताच्या वेळी प्रथमोपचार बाबतही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांचीही कार्यशाळा घेण्यात येणार असून लेन कटींग, अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *