CBSE: दहावी गणिताची फेरपरीक्षा नाही!

परीक्षेआधीच फुटलेल्या दहावीच्या गणित विषयाच्या पेपरची फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) घेतल्याचं सूत्रांकडून समजतं. याबाबतचा अधिकृत निर्णय आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

सीबीएसई दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. यावर सरकारनं फेरपरीक्षा घेण्याचा विचार सुरू केला होता. मात्र, त्याला देशभरातून विरोध झाला. विरोधानंतर बॅकफूटवर गेलेल्या सरकारनं केवळ पेपर फुटलेल्या ठिकाणी, म्हणजेच दिल्ली एनसीआर व हरयाणा इथंच फेरपरीक्षा घेतली जाईल, असं जाहीर केलं होतं. मात्र, आता कुठेही फेरपरीक्षा होणार नसल्याचं समजतं.

नव्या निर्णयामुळं दिल्ली एनसीआर व हरयाणातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. काही उत्तरपत्रिकांच्या तपासणीनंतर बोर्ड या निर्णयाप्रत आल्याचं समजतं. पेपरफुटीचा परिणाम सार्वत्रिक नसल्याचं उत्तरपत्रिकांच्या तपासणीतून दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत सरसकट फेरपरीक्षा घेणं योग्य ठरणार नाही, असं बोर्डाचं मत असल्याचं समजतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *