संपत्तीत वाटेकरी नको म्हणून भावाची हत्या

वडिलांच्या संपत्तीत वाटेकरी नको म्हणून सासूच्या सांगण्यावरून आणि पत्नीच्या मदतीने एका तरुणाने पाच वर्षांच्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन महिन्यांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील भिंगाण येथे ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणासह पत्नी आणि सासूलाही अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भिंगाण गावातील वैभव पारखे (वय ५) हा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. १३ दिवसांनी त्याचा मृतदेह घराजवळच सापडला होता. या घटनेची पोलीस चौकशी करत होते. तीन महिन्यांनी त्याची हत्या मोठा भाऊ लालासाहेबने केल्याची माहिती समोर आली. संपत्तीत वाटेकरी नको म्हणून त्याची हत्या केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या प्रकरणी लालासाहेब बापू पारखे (वय २७), काजल पारखे (वय २१) आणि संगीता अंकुश वरपे (सासू) या तिघांना अटक केली. सासूच्या सांगण्यावरून दगडाने ठेचून वैभवचा खून केला. तो १३ नोव्हेंबर २०१७ रोजी घरी आला. दुपारी झोपेत असताना त्याची हत्या केली आणि मृतदेह घरामागील झुडपांत फेकून दिला, अशी कबुली लालासाहेब याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *