त्र्यंबकेश्वरमधील एका आदिवासी कुटुंबातील १७ वर्षांच्या मुलीचा विवाह दिंडोरी तालुक्यातील मुलाशी ठरले होते. विशेष म्हणजे हा आंतरजातीय विवाह होता! मात्र, हा बालविवाह असल्याची माहिती चाइल्ड लाइनपर्यंत पोहोचली. यात मुलीचे वय १७ असल्याचे समोर आले. घटत्या संख्येमुळे योग्य उपवर नसल्याने अनेक विवाहेच्छू तरुण मिळेल ते स्थळ स्वीकारत आहेत. त्याचाच हा एक भाग असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.
त्र्यंबकेश्वरमधील एका धर्मशाळेत शुक्रवारी हा विवाह होणार होता. मात्र, चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी विवाह होण्यापूर्वीच मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्यांना बालविवाह, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, कायदा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई याची माहिती दिली. चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर मुलीच्या पालकांना त्यांची चूक उमगली. मुलगी १८ वर्षांची झाल्याशिवाय आता लग्न होणार नाही, असा ठाम निश्चिय पालकांनी बोलून दाखवत दोन पावले माघार घेतली.
– मच्छिंद्र विंचूरकर, चाइल्ड लाइन
