बँकांकडून अतिरिक्त शुल्क नाही : अरुंधती भट्टाचार्य

बँकांकडून गरीबांना नाडम्यात येत असल्याचे व त्यांच्याकडून खात्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क घेतले जात असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले. बँक बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही म्हणून गरीबांकडूनही बँक शुल्क वसूल करते, या आरोपाचा भट्टाचार्य यांनी जोरदार इन्कार केला. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांसाठी कोणतेही शुल्क किंवा दंड आकारण्यात आलेला नाही. उलट, स्टेट बँकेने बेसिक सेव्हिंग्ज बँक अकाउन्ट (बीएसबीडी) हे नवे खाते सुरू केले असून अन्य बँकांसाठी ते आदर्श उदाहरण बनले आहे, असेही त्या म्हणाल्या.

बीएसबीडी खाते हे समाजातील अल्पउत्पन्नधारक व गरीब वर्गासाठी आहे. या वर्गालाही कोणत्याही शुल्काविना बचत करण्याची सवय लागावी व तशी संधी मिळावी, यासाठी हे खाते सुरू करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला बँक खात्यासाठी सुल्क आकारले जाते, ही अफवा असून अशा कंड्या माध्यमांनीच पिकवल्या आहेत, असा आरोपही भट्टाचार्य यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *