कोरेगाव भीमाची घटना पूर्वनियोजित : पवार

कोरेगाव भीमाची घटना पूर्वनियोजित होती. या प्रकरणातील दोन्ही बाजूच्या लोकांची भेट झाली आहे. या दंगलीत बाहेरचे लोक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता या मागचे आरोपी सरकारने शोधून काढावेत, अशी मागणीही पवारांनी केली. नागपूर अधिवेशनानंतर दोन्ही काँग्रेस एकत्रित आले असून, आता या सरकारच्या विरोधात एकत्रित काम करण्याची भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची असल्याचे पवार म्हणाले.

राष्ट्रीयकृत बँकांना केंद्राने ८० हजार कोटी कसे दिले?

‘महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्यावर काही मंडळींच्या पोटात दुखतंय, पण गेल्या १५ दिवसांत राष्ट्रीयकृत बँकेचा तोटा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने तिजोरीतून ८० हजार कोटी रुपये कसे दिले,’ असा सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

अकलूज येथे महिला वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी आलेले पवार पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असे म्हणणाऱ्या सरकारकडे बँकांची तूट भरून काढायला पैसे कोठून आले. कोणाच्या कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *