राज्यात वाढला थंडीचा कडाका

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरू झाल्याने मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेतील थंडीमुळे राज्यातील तापमानाचा पाराही घसरण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी कुलाब्यातील किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. गेले काही दिवस सकाळी पडणाऱ्या धुक्याचे प्रमाण येत्या काही दिवसांत कमी होण्याची चिन्हे आहेत.

हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीला सुरुवात झाली असून पुढील २४ तासांत तेथील काही भागांत बर्फवृष्टी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडी व खास करून बर्फवृष्टी सुरू झाल्यावर राज्यात तापमानाचा पारा खाली येतो. सध्या राज्यात तापमानाचा पारा खाली येण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात ब्रह्मपुरी, उस्मानाबादमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. नाशिकमध्ये १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबईतही सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका वाढला आहे. सांताक्रूझ वेधशाळेने १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे. तर, कुलाबा वेधशाळेने किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. येत्या २४ ते ४८ तासांत धुक्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *